बौद्धशासन व धम्म चळवळीतील अंतर्विरोध

Share:


बौद्धशासन व धम्म चळवळीतील अंतर्विरोध

अनित्यवाद , अनात्मवाद , प्रतित्यसमुत्पाद हि
बुद्धाची मुलतत्वे आहेत । यात ईश्वर व ब्राह्मणाला स्थान नाही . ईश्वराला स्थान नाही म्हणून स्वर्ग,नरक, मोक्ष , इत्यादी पारलॊकिक
 कल्पनानाही स्थान नाही ।
कर्माच्या दैववादी दृष्टीकोनाला ,  पूजा प्रार्थनेला , कर्मकांडाला ,
 ईश्वरावरील विश्वासाच्या अनुषंगाने येणाऱ्या पुरोहित जुतारूंचा
 थोतांडालाही
स्थान नाही . चमत्कार ,  तंत्र - मंत्र - यंत्र  इत्यादी भ्रामक समजूतीलाही स्थान नाही..


             इ . स . पु  पाचव्या शतकात बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तन करून वैदिक धर्मावर वीजय मिळविला . त्या नंतर तब्बल २५०० वर्ष्यानी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरे धम्म चक्र प्रवर्तन करून ब्राह्मिधर्मावर विजय मिळविला . या घटनेच्या सुवर्ण मोहत्सवी वर्ष्यात लक्ष्यमन माने यांच्या भटक्या विमुक्तांसह मुंबई व इतरत्र बौद्ध धम्माची दीक्षा देण्याचे कार्यक्रम होंत राहिले .
या दरम्यान आमच्या वर्तमान्पात्रातून बौद्धांचे प्रबोधन करणारे अनेक मौलिक लेख प्रसिद्ध झालेत । त्यातून धम्माबद्दल ची आस्था वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त झाली । धर्मांतराच्या अर्ध्या शतकानंतर हि आंबेडकरी बौद्धांकडून धम्म आचाराबाबत फारशी प्रगती झाली नाही ।

धर्मांतराच्या अर्धशतकानंतरही आंबेडकरी बौद्धांकडून धम्म आचाराबाबत फारशी प्रगती झाली नाही ।

काही शिक्षित - अशिक्षित अद्यापही जुन्या संस्कारातून बाहेर पडू शकले नाहीत । या बद्दल या लेखात खंत व्यक्त करण्यात अली ।
१९५६ साली धम्मचक्र प्रवर्तन करताना बाबासाहेबानी एक
। स्वप्न पहिले होते । नवदीक्षितताना काही  इशारे दिले होते , पण
त्याची पूर्तता करण्याची औकात आमच्यात निर्माण झाली नाही ।

 हे आम्हाला कबूल करावेच लागेल । 


पण त्याची योग्य कारण मीमांसा ना करता उठ-सुठ आंबेडकरी बौद्धांवर आगपाखड करीत राहणे हे हि न्यायाचे होणार नाही ।
आमच्याच एका दैनिकात धर्मांतराच्या ५२ व्या वर्धापन दिन अंकात
: सुवर्ण महोत्सवी धम्म परिषदाचे मर्म ; हा आचार्य स्वामि ध्यान संदेश भालेकर नागपूर यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे । त्यात त्यांनी धम्म चळवळीचे नेतृत्व करणारांचे लक्ष्य बुद्ध जयंती पेक्ष्या विजया दशमीच्या पारंपरिक तारखीकडे असते ।
त्यामुळे आम्हाला धर्मांतर हवे , बुद्ध नको असे संकेत त्यातून मिळतात ।असा आक्षेपार्य विचार व्यक्त केला आहे । १९५६ च्या अशोक विजयादशमीला बाबासाहेबानी महास्थाविर चांद्रमणीजी यांच्याकडून त्रिशरण - पंचशील ग्रहण करून बुद्ध धम्माची दीक्षा घेतली व त्याच वेळी त्यांनी आपल्या ५ लाख अस्पृश्य अनुयायांना २२ प्रतिज्ञा सह बुद्ध धम्माची दीक्षा दिली , हि एक अभूतपूर्व व युगान्तकारी ऐतिहासिक घटना आहे ।
आंबेडकरी बौद्धांसाठी ती केवळ तारीख नाही , धम्म चळवळीचेतृत्व करणाऱ्यांविरुद्ध आक्षेप असू शकतात , पण ते नोंदविताना बुद्ध आंबेडकरात द्वैतभाव उभा करणारा विचार व्यक्त करण्याची आवश्यकता नाही । म्हणूनच स्वामि ध्यान संदेश यांच्या हेतू बाबत संशय निर्माण होतो ।

आंबेडकरी बौद्ध  मूलतत्त्ववादी आहेत त्यामुळे त्यांना विपस्सना नको , बौद्ध मंत्र नकोत , बौद्ध राष्ट्रांच्या जीवनपध्दत्ती वगैरे नकोत असा या आचार्यांचा आक्षेप आहे ।

 मूलतत्त्ववादी  म्हणजे कर्मठ धर्माभिमानी ।

धर्म अपरिवर्तिनय असून त्यात कोणताहि बदल करण्यास नकार देणार्याला मूलतत्त्ववादी म्हणतात ।
हिंदू आणि इस्लाम धर्मातील कर्मठांना हि संज्ञा लावण्यात येते ,
धर्माला अफू ची गोळी मानणारे पोथीनिस्ट ; साम्यवादी ; कडव्या धर्माभिमान्यांना मूलतत्त्ववादी हि शिवी हासडतात ।

आंबेडकरी बौद्ध कर्मठ धर्मांध लोक आहेत असें म्हणता येईल काय ?

अनित्यवाद , अनात्मवाद , प्रतित्यसमुत्पाद , हि बुद्धाची मुलतत्वे आहेत । यात ईश्र्वर वा ब्राह्मणाला स्थान नाही , ईश्वराला स्थान नाही म्हणून स्वर्ग ,नरक , मोक्ष इत्यादी पारलौकिक कल्पनांनाहि स्थान नाही ।
कर्माच्या दैववादी दृष्टीकोनाला , पूजाप्रार्थनेला , कर्मकांडाला , ईश्वरावरील विश्वासाचे अनुषंगाने येणाऱ्या पुरोहिती लुटारूंच्या थोतांडालाहि  स्थान नाही ।
चमत्कार , तंत्र - मंत्र - यंत्र इत्यादी भ्रामक समजूतीलाही स्थान नाही ।
माणसाला न्याय , मैत्री , स्वतंत्र , समता , बंधुत्वाची शिकवण देणारे

माणसाने माणसांसाठी शोधून काढलेले तथागतांचे हे बुधाश्यासान बुद्धिवादी अनुभवांवर आधारलेले असल्यामुळे बुद्ध आपल्या शिष्यानं शेवटचा संदेश देताना सांगतात कि ,
; माझ्या पश्चात संघाला आवश्यक वाटेल तर , जे छोटा मोठे नियम आहेत त्यांचा त्याग करता येऊ शकतो ।

आपली शिकवण स्खलनरहित नसल्याची बुद्धाने दिलेली हि गव्हाहि आहे ।
यावरून स्पस्ट होतेय कि , धम्म नियमात बदल करण्याचा अधिकार , बुद्धाच्या मूलतत्वातच अंतर्भूत आहे ।

बुद्धाच्या मूलतत्वांचा आग्रह आंबेडकरी बौद्ध धरीत असतील तर ते बुद्धशासनाशी सुसंगत असे धम्म कृत्य आहे ।

 म्हणूनच आम्हाला असे वाटते कि , स्वामि ध्यान संदेश याना बुद्धाचा मूलतत्ववादचं  आक्षेपाह्य वाटतो कि काय ?
धम्म चळवळीतील नेतृत्वावर टीका करताना आचार्य असा दावा करतात कि ओशो , गोएन्का , दलाई लामा , हेच खऱ्या अर्थाने बुद्धाच्या विचारांची जोपासना संवर्धन आणि प्रसार - प्रचार करतात त्याला जगात तोड नाही ।

स्वामी ध्यानसंदेश यांनी कुणाचे वकील पात्र घ्यावे वा कुणाचे घेऊ नये हे सांगण्याचा अधिकार आम्हाला नाही ।  परंतु आंबेडकरी बौद्धांवर टीका करताना अनुषंगाने डॉ . बाबासाहेबांचे अवमूल्यन करण्याचा खोडसाळ प्रयत्न त्यांनी निश्चितच केला आहे ।

आचार्य रजनीश म्हणजे वैश्विक विस्तार पावलेल्या एका अध्यात्म केंद्राचा नवा भगवान । ज्यांची योग , झेन , ताओ  आणि तंत्र विषयावरील प्रवचनाचे संकलन आज शास्त्र झाली आहेत । आणि या शास्त्रांवर एकाधिकार मिळविण्यासाठी त्यांच्या अनुयायातच जुंपली आहे ।
ते स्वतःला भगवान म्हणविणारे आचार्य रजनीश आपण महावीर बुद्ध आणि माओतसें सारखे निरीश्वरवादी आहोत असे म्हणायचे ,
त्यांनी २६ डिसेंबर १९८८ रोजी आपल्या अनुयानांसमोर घोषणा केली कि , गौतमबुद्धाच्या ; भविष्यवाणी नुसार ; माझे नाव मैत्रेयी बुद्ध असेल ,
त्यानंतर दोनच दिवसांनी माझे नाव ; जोरबा ; बुद्ध असायला हवे अशी घोषणा केली ।
त्यानंतर काही आठवडयांनी त्यांनी ; ओशो रजनीश  ; असे नाव धारण  केले ।
१५ सप्टेंबर १९८९ रोजी ते केवळ  ; ओशो : राहिले ।
ओशो म्हणजे पूर्ण पुरुष

 : ; परंतु या पूर्ण पुरुषाला विवाह संस्थे बद्दल घुणा होती , ते म्हणायचे वाटेल त्याच्याशी  प्रेम  करा । जेव्हा अशी सवलत असते , तेव्हा तुम्ही स्वतंत्रतापूर्वक प्रेम करतात आणि  प्रेम तुमच्या पायातील बेडी बनत नाही  , तुम्ही प्रेमात भागीदारी करू शकता , दोन व्यक्ती जेव्हा एक दुसऱ्याच्या ऊष्मांचा आनंद घेतात , तर त्यात कोणतीच समस्याच राहत नाही , राजनीशांचे  हे दर्शन मुक्त प्रेम , स्वछंद संभोगाचे तत्वज्ञान  आहे 


; ओशोंच्या मते  धर्म , अध्यात्म  वा दर्शन  -- लास्ट लुक्सझरी लाइफ --आहे  । 

शो चे हे तत्वज्ञान बुद्धाच्या नीतिधम्मात  बसते काय  ? याचे उत्तर  आचार्यांनी  द्यायला हवे ...

सत्यनारायण गोयंका गुरुजी यांची विपस्सना , ओशोंची सक्रिय [ डायनॅमिक ] ध्यान पद्धती , महर्षी महेश योगी यांचे भावातीत ध्यान , चिन्मय मिशन चा  ; पातंजल योग यांच्या अध्यात्माच्या  वैश्विक स्पर्धेत स्थान उंचावण्या  इतकी  पॉप्युलर निश्चितच  आहे । 

 आंबेडकरी बौद्ध विपस्सना विरोधी नाहीत । बाबासाहेब म्हणतात , 


बुद्धाच्या शिकवणुकीबाबत , बौद्ध धम्माच्या अनुयायांत व अभसकात मतभिन्नता आहे । काहींच्या मते , समाधी हा बुद्धाच्या शिकवणुकीचा मुख्य गाभा आहे , काहींच्या मते विपस्सना प्रमुख शिक्षा आहे , काहींच्या मते धम्म म्हणजे केवळ दीक्षिताना सांगावयाचा गुप्त मंत्र आहे , काहींच्या मते तो शुश्कतत्वविमानसा आहे , काहींच्या मते तो विशुद्ध रहस्यवाद आहे , काहींच्या मते ते ऐहिक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे , 
ज्यांना बौद्ध धम्माचे सार , समाधी , विपस्सना किंवा दीक्षितांना प्राप्त होणाऱ्या गुप्त मंत्रात आहे , असे  वाटते ; ते लोक एकांगी विचारवंत होत ।

; विपस्सनेला धम्माचे सार समजणारे लोक ; बुद्धाच्या सामाजिक संदेशांकडे , डोळेझाक करतात । तेव्हा त्यांचा दृष्टीकोन एकांगीच असतो ।
त्याला आंबेडकरी बौद्धांचाहि  विरोध असतो , विपस्सनेला विरोध असत नाही ,
तो ज्याचा त्याचा  प्रश्न आहे ,

आज आंबेडकरी बौद्ध हि विपस्सना करीत आहेतच , आचार्यांना त्याची माहिती नसेल , तर त्याला आमचा उपाय नाही  ।

दलाई लामा , तिबेटमधील एका बौद्ध संप्रदायाचे प्रतिष्ठित धर्म गुरु आहेत ।

 दलाई लामा याना तिबेट चे , सार्वभौम शासक आणि धर्म गुरुचे दैविक अधिकार मिळाले आहेत । १९५६ मध्ये चीन ने दलाई लामा यांचे शासन समाप्त करून तिबेट ला चीन मध्ये सामावून घेतले , तेव्हापासून ते आपल्या अनुयायांसह निर्वासित राजाप्रमाणे भारतात राहत आहेत । काही वर्षा पूर्वी दलाई लामा यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात , बुद्धाजवळ डॉ . बाबासाहेबांची प्रतिमा ठेवण्याबाबत नाराजी व्यक्त केली होती ।

परंतु भारतातील अनेक तिबेटी बुद्धमंदिरात , बुद्धा शेजारी दलाई लामा यांची प्रतिमा ठेवलेली असते ,
असे आमच्या पाहण्यात आले आहे ।
दलाई लामा धर्मगुरू आहेत , तर बाबासाहेबाना हि ; बोधिसत्व .. या उपाधीने भूषविण्यात आलेले आहेत .म्हणूनच ,
जे आंबेडकर द्वेष्ठे आहेत ,  ते आंबेडकरी बौद्धांना बाबाइतके प्रिय कसे होऊ शकतील ?

ज्यांना ओशो व तत्सम एकांगी शिकवण देणाऱ्या बौद्ध धर्मीय महायानियांचे , मठाधीशांचे कर्तृत्व लाख मोलाचे वाटू लागले आहेत ,

ते एकतर बाबांचे अनुयायी नसतील ।  किंवा त्यांनी हा ग्रंथराज अभ्यासला नसेल ...


                            भगवान बुद्ध , लोकशाहीचे  प्रणेते  !

जगातला पहिला विश्वव्यापक धर्म , गौतम बुद्धाने स्थापला असे , लक्ष्मण शास्त्री जोशी चे गौरोवद्गार आहेत ..
अशोकाच्या  समयी व भारतातून बौद्ध धम्माचा  ऱ्यास सुरु झाल्या नंतर ,
बौद्ध धम्म श्रीलंका , म्यानमार , थायलंड , चीन , जपान , कोरिया , तिबेट , मंगोलिया , कंबोडिया , जावा , सुमात्रा , अफगाणिस्तान , तुर्कस्तान , इत्यादी देशात पोहचला , व
देशकाल परस्तिथी प्रमाणे तो तेथे रुजला , त्यांनीच भारतातून परागंदा झालेला बुद्ध धम्म  व बौद्ध ग्रंथ सांभाळून ठेवले । म्हणून ते आपल्या पर्यंत पोहचले आहेत . याबाबत आम्ही या देशाचे ऋणी  आहोत .

पूण त्याच बरोबर आज त्या देशात जो बौद्ध धम्म आहे तो , बुद्धांच्या मूळ शिकवणी पासून दुरावला आहे ।
अनेक संप्रदायात विभक्त असलेल्या देशोदेशींच्या बुद्धानुयायांना बुद्धांच्या मूळ तत्वज्ञानाची जाणीव व्हावी यासाठी बाबासाहबांनी अत्यंत परिश्रमपूर्वक ; बुद्ध अँड हिस धम्मा ; या इंग्रजी ग्रंथराजाची रचना केली ।

बौद्ध जगताला मार्गदर्शक ठरावा इतकी या ग्रंथाची महत्त्त्तता  आहे ,
परंतु हा ग्रंथ जेव्हा प्रसिद्ध झाला तेव्हा , मात्र बुद्धाच्या दैवतीकरणात तंत्र - मंत्रात धर्म शोधणाऱ्या काही महाभागांनी ..
; एका महान माणसाने लिहिलेला लहान ग्रंथ  ; अशी त्याची संभावना केली ..

बौद्ध देश मूळ , बुद्धमतापासून भरकटलेले आहेत , म्हणूनच बाबासाहेबानी बौद्ध धम्म स्विकारण्याच्या पूर्व संध्येला पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते कि ..
; ..कोणत्या हि , प्रचलित बौद्ध पंथापासून ... हीनयान , ...महायान ; व कोणत्याही इतर यानांपासून आपण  आणि  आपल्या अनुयायांना अलिप्त  ठेवणार आहोत , हि गोस्ट त्यांनी अधोरेखित केली होती ।।

स्वामि ध्यान संदेश यांच्यासारख्या आचार्यांनी , अभ्यासकांनी हि बाब लक्ष्यात घ्यायला हवी ,

बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर , नवदीक्षितांना धर्म शिकविण्यात आले ते परदेशी बौद्ध भिखू .
ते आले त्यांच्या देशात असलेले धर्म ग्रंथ , पुराण ग्रंथ  घेऊन । त्यांच्या जवळ असलेला जुनापुराणा साचलेला , स्थगित झालेला बौद्ध धम्म घेऊन
या परंपरानिष्ठ  परदेशी बौद्ध भिखुनी दीक्षित जनतेला जे धर्मशिक्षण दिले
त्याचा उपयोग पूजा - प्रार्थना , जन्म - मृत्यू - विवाह इत्यादी धर्मसंस्कार ,

कसे करावेत यांच्या पुरतेच ते मर्यादित होते ..

या परंपराग्रस्थ भिक्खुंच्या मार्गदर्शनाखाली धर्मशिक्षण घेऊन जे आचार्य तयार झाले , त्यांच्या जाणिवेत बाबासाहेबाना अभिप्रेत असलेला ।।
; बुद्ध आणि त्यांचा  धम्म उतरलाच नाही ;
म्हणूनच नवदीक्षितांना , अडाणी -  शिक्षितांना ; बुद्ध आणि त्यांचा धम्म ; समजावून सांगणारे भिखू  इथे निर्माण होऊ शकले नाही ।।

बाबांना निस्वार्थी चारित्र्यसंपन्न आणि लोकसेवक संघ अभिप्रेत होता , 
त्याची पूर्तता किती झाली , हे तुम्ही आम्ही पाहतच आहोत .

बाबांना अभिप्रेत असलेला प्रबुद्ध समाज का निर्माण होऊ शकला नाही ?
आंबेडकरी बौद्धांकडून धर्म आचाराबाबत फारशी प्रगती होऊ शकली नाही ?
याचे उत्तर या परिच्छेदात आहे ..


बौद्ध धर्म अनेक देशात समृद्ध स्तिथीत आहे ,
श्रीलंका , थायलंड , म्यानमार सारख्या देशात राजसत्तेला दोलायमान
करण्याइतकी शक्ती तेथील बौद्ध धर्मात आहे .
धर्मांतरानंतर भारतात विदेशी बौद्ध संस्थांचा व भिक्खूंचा पायरव वाढला आहे ..

       गत अर्ध शतकात पर्यटनाच्या खाजगीकरणामुळे येथे विदेशी बौद्ध संस्थांना हस्तक्षेप कारणे सोयीचे झाले आहे , त्यामुळे भारतातील [ युपी , बिहार ] बौद्ध स्थळे नव्या शक्ती केंद्राच्या रूपात विकास पावत आहेत .

भारतातील बौद्ध समाज बुद्ध धर्माला पुनर्जीवित करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे ,
परंतु बौद्ध जगतातील बुद्धानुयांशी त्याचा जिवंत संबंध अद्याप प्रस्तापित होऊ शकला नाही .

एकीकडे बाबासाहेबांचे बुद्धिवादी अनुयायी बुद्ध धर्माला निखळ , भौतिकवादी रूप देऊ पाहत आहेत .
तर दुसरीकडे विदेशी बौद्ध संस्था व भिखू  यांच्या या प्रभावाखालील भारतातील अध्यात्मिक भिखू समित्यांचे उपासक , पूजा प्रार्थना , आचरण इत्यादी कर्मकांडात्मक सांप्रदायिक रूप देऊ पाहत आहेत .

      त्यामुळे धम्मचळवळीत गतिरोध झाला आहे ।।

अश्या संक्रमण काळात केवळ आंबेडकरी बौद्धांकडून उच्चकोटीची ,
प्रगल्भता अपेक्षिणे योग्य नव्हे । 
त्या दिशेने संथ गतीने का होईना ।।
आंबेडकरी बौद्धांची वाटचाल सुरु आहे ।।
तूर्त इतकेच म्हणता येईल  कि ,
     नही है ना उम्मीद इक्बाल अपने किशते विरासे  !
     जरा नम हो , तो ये मिट्टी  बडी  जरखेज  हे साकी !



No comments